Saturday 7 October 2017

वनामकृवित माती व पिकांच्‍या शाश्‍वत आरोग्‍य याविषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन

परिसंवादात साधारणत: दोनशे मृदा शास्‍त्रज्ञांचा सहभाग 
भारतीय मृद विज्ञान संस्था, शाखा परभणीच्या वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात माती व पिकांच्‍या शाश्‍वत आरोग्‍य या विषयावर राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन ७ व ८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले असुन परिसंवादचे उद्घाटन दि. ऑक्टोंबर सकाळी १०.०० वाजता कृषि महाविद्यालय सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू हे राहणार असुन दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु मा. डॉ. शंकरराव मगर, औरंगाबाद येथील वाल्मीचे माजी संचालक डॉ. एस. बी. वराडे हे प्रमुख पाहूणे म्हणून तर शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विलास पाटील, संशोधन संचालक डॉ. डी. पी. वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
परिसंवादास महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठातील तसेच भारतीय कृषि अनुसंधान संस्थातील सुमारे 200 शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. परिसंवादात बदलत्या गरजेनुसार जमीन व पिकांचे शाश्वत आरोग्य या विषयावर मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहेत. जेणेकरुन भविष्य काळात उद्योग कृषि विकास यांना सुयोग्‍य तसेच जमिन व्यवस्थापन संबधीचे धोरण निश्चि करण्यास मदत होईल. भारताने अन्नधान्य उत्पादनात ‍स्वयंपूर्णता गाठली असली तरी मागील काही वर्षापासून धान्योत्पादन एका ठराविक पातळीवर येवुन स्थिर झालेले आहे. धान्योत्पादनात घट येणाच्या अनेक कारणापैकी जमिनीची दिवसेंदिवस खालावत असलेले आरोग्य, सुपिकता व उत्पादन क्षमता हे प्रमुख कारणे आहेत. शेती उपयुक्‍त जमिनी शेती व्यवसाया व्यतिरिक्त इतर घटकाकरीता फार मोठया प्रमाणात वापरण्यात येऊ लागलेली असुन अन्न व पर्यावरण सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून ही गंभीर बाब आहे.
मृदा आरोग्य साठी सन २०१५ ते २०२४ हे आंतरराष्ट्रीय दशक म्हणून साजरे केले जात असुन सन २०१५ हे आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणुन साजरे केलेभविष्यकाळात जमिनीचे आरोग्य, सुपिकता व उत्पादन क्षमता वाढविण्याचे दृष्टीकोनातून योग्य ती पावले वेळीच उचलने गरजेचे आहे. शेतकरी, शास्त्रज्ञ, विस्तार कार्यकर्ते शासनातील नियोजकर्ते यांच्यामध्ये योग्य ती जाणिव जागृत करुन या विविध घटकामध्ये समन्वय साधुन कृषि क्षेत्राची पुढील वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातुन भारतीय मृद विज्ञान संस्था, शाखा परभणीच्या वतीने सदरिल परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवाद यशस्‍वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष डॉ. सय्यद ईस्माईल, सचिव डॉ. महेश देशमुख, उपसचिव डॉ. गणेश गायकवाड, डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, प्रा. अनिल मोरे, डॉ. आर. एन. खंदारे, डॉ. एस. टी. शिराळे, प्रा. प्रभाकर अडसुळ, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. स्वाती झाडे, प्रा. गजभिये, डॉ. सदाशिव अडकिने, संतोष पिल्लेवाड, श्रीमती महावलकर, अजय चरकपल्ली आदीसह पदयुत्तर विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.

1 comment: